ज्ञानेश:
मी सचिनचा फ़ॅन नाहीये
आणि द्रविडचा तर मुळीच नाही
पर्सनल स्कोरसाठी खेळणारी लोकं आहेत ही
Sehwag is best!!!
अमेय:
:)
ज्ञानेश:
सेहवाग गॉड आहे गॉड
३००च ३ वेळा
आवरा
सचिनच्या स्वप्नात सुद्धा ३०० आले नसतील
अमेय:
:)
ज्ञानेश:
द्रविड आपला मरत मरत १०० काढतो
सेहवागला तोड नाही !!!
अमेय:
मोठ्या लोकांना नाव ठेऊन आपण मोठं होत नसतो मित्रा
:)
ज्ञानेश:
इथे मोठं कोण आहे?
फक्त सेहवाग
अमेय:
सचिन, द्रविड
ज्ञानेश:
शीSSSS ईई
सचिन आणि द्रविड ?????????
या संभाषणावरून साहजिकच रण पेटलं !! आणि समस्त सचिन, द्रविड प्रेमींची बाजू मांडण्याची जबाबदारी मी घेतली!! काम तसं सोपं होतं :-)
अमेय जांभेकर - ज्ञानेश मित्रा, आपले खाजगी मध्ये चाललेले वाद चव्हाट्यावर आणून मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या. पण तुला हे दाखवून द्यायचं होतं की आज लोकांच्या मनात सचिन, द्रविड या खेळाडूंचं काय स्थान आहे ते. सचिन विषयी तोंडातून नुसता ब्र काढल्या काढल्या १५ मिनिटात २५ पेक्षा जास्त (जळजळीत!!) प्रतिक्रिया आल्या (त्या पण जगभरातून !!!) तरी पण तुझ्या स्वैर गोलंदाजीचा आपल्या कसलेल्या फलंदाजांनी घेतलेल्या समाचाराबद्दल माफी मागतो आणि माझे म्हणणे मांडायला घेतो.
सर्वप्रथम आपण जेंव्हा सांघिक खेळाविषयी बोलतो तेंव्हा २ खेळाडूंची तुलना करणे मला योग्य वाटत नाही आणि ते पण एकाच संघामाधल्या तर नाहीच - सेहवाग खेळला की सचिन खेळला याला महत्व नाही. संघ जिंकला का हे महत्वाचे आहे. इथे सामना २ संघांमध्ये आहे, खेळाडूंमध्ये नाही. आपल्या कामगिरीचा संघाच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम होणार हे प्रत्येक खेळाडूला माहित असते. संघाच्या यश-अपयशावर आपले यश अपयश अवलंबून असते हे पण तितकेच खरे आहे. अशा परिस्थितीत कोणी खेळाडू संघाचा विचार सोडून केवळ स्वतःच्या कामगिरीचा विचार करेल हे मनाला पटत नाही. तू जर एक गोष्ट पहिली असशील तर ती म्हणजे सेहवाग फालतू आहे अशी कॉमेंट कोणीच टाकली नाहीये, सगळ्यांचा रोष सचिन आणि द्रविडला कमी लेखल्याबद्दल होता. तुझ्या मतांचा आम्ही आदर करतो पण एखादा संघ, खेळाडू महान आहे किंवा तुला तसे वाटते, म्हणजे बाकीच्या खेळाडूंना तू कमी लेखू शकत नाहीस. माझा आक्षेप याच गोष्टीला आहे. जर्मनीचा संघ तरुण खेळाडूंचा आणि उत्तम सांघिक कामगिरी करणारा संघ होता, पण तू स्पेन फालतू आहे म्हणालास ते चुकीचं होतं. आणि स्पेनच्या संघाने ते दाखवून दिलं.
आता तुझं म्हणणं आहे की सचिन, द्रविड हे खेळाडू स्वतःसाठी खेळतात :
प्रथम द्रविड विषयी बोलूयात
द्रविड या माणसाविषयी मला अतिशय सहानुभूती आहे. त्याने नेहमीच पडद्यामागे राहून, वेळ प्रसंगी दुय्यम भूमिका घेऊन संघाचे हित पहिले आहे असं मला वाटतं ............ सांगतो कसं ते ........ द्रविडचा संघाने (गांगुलीने!!! ) नेहमीच आपल्याला हवा तसा उपयोग करून घेतला : एक अतिरिक्त फलंदाज खेळवता यावा म्हणून त्याच्यावर २००२-२००३ मध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकली. कधी सलामीचा फलंदाज नाही म्हणून कसोटीमध्ये त्याला सलामीला पाठवण्यात आलं. कधी त्याने ६ व्या क्रमांकावर येऊन सामना एकहाती काढून दिला. अगदी त्याचा पदार्पणाचा सामना आठवावा. त्याच सामन्यात गांगुलीने देखील पदार्पण केले होते, त्याने शतक ठोकले त्यामुळे त्याची कामगिरी लक्षात राहिली पण द्रविडला शतकासाठी ५ धावा कमी पडल्या तर आपण लगेच ती कामगिरी विसरून गेलो. २००१ मध्ये आपण फोलो-ओन नंतर ऑस्ट्रेलियाला हरवले तेंव्हा लक्ष्मणचे कौतुक झाले पण द्रविडने देखील १८१ धावांची खेळी केली होतीच ना? या सगळ्यात स्वतःचे हित कुठे पहिले त्याने?? २००३-०४ चा ऑस्ट्रेलिया दौरा तर त्यानेच गाजवला. त्याचं चीज म्हणून त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं आणि नंतर ICC चा मोसमातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब देखील मिळाला. संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढून सामना जिंकून देणे ही द्रविडची शैली तर सुरवातीपासून विजयाचा पाया रचणे आणि सामना जिंकून देणे ही सचिनची शैली.
सचिनविषयी काही बोलायची गरज आहे का? तरी पण थोडं सांगतो
त्याच्या खेळ्या आणि त्याचे तंत्र या विषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ..........
कोणत्याही संघाशी आणि कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी (कसोटी, एक दिवसीय आणि टी२०) जुळवून घेणे ही सचिनची खासियत. त्यामुळेच आज तो २० वर्ष पाय घट्ट रोवून उभा आहे. १९८९ मध्ये पदार्पण झाल्यापासून आजपर्यंत तो ७ वेगवेगळ्या कर्णधारांसोबत खेळला आहे पण कोणत्याही प्रकारचा वाद कधी उदभवलेला आपण ऐकला नाही, कारण? ते संघहिताचे नाही हे सचिनला माहित आहे. आज टी २० न खेळण्याचा निर्णय हा पण संघ हिताचाच भाग म्हणावा लागेल. त्यावरून असा निष्कर्ष काढण्याचा पण प्रयत्न झाला की सचिनला या प्रकाराशी जुळवून घेण्यात त्रास होतो वगैरे. पण यंदाच्या आयपीएल मध्ये त्याने हा मुद्दा खोडून काढला. आकड्यांवर विश्वास आहे का? सचिनला एकदिवसीय सामन्यांमध्ये ६१ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्यापैकी ५५ सामने भारताने जिंकले आहेत .......... मग तो संघासाठी खेळत नाही म्हणणे योग्य आहे का?
प्रती-आक्रमण करून समोरच्या संघाला हतबल करायचं ही सेहवागची शैली. तांत्रिक दृष्ट्या तो सचिन, द्रविड यांच्या जवळपास देखील नाही पण तरी त्याच्या शैलीने सगळ्यांनाच भुरळ पाडली हेही खरं. सोबर्स, व्हिव रिचर्डस या जुन्या खेळाडूंनी पण त्याचं कौतुक केलंय. पण सेहवाग मोकळेपणाने का खेळतो याचा विचार केलाय का कधी? कारण त्याच्यावर अपेक्षांचे ओझे नसते. आपल्यानंतर सचिन, द्रविड सारखे फलंदाज आहेत हे त्याच्या मनाला माहित असते. सेहवागवर आपला संघ कधीच अवलंबून नसतो कारण तो अगदी पुढच्याच चेंडूवर देखील बाद होऊ शकतो, हे सगळ्यांनाच माहित असते अगदी त्याला स्वतःलासुद्धा. त्यामुळे त्याने केलेल्या धावा ह्या संघासाठी नेहमी बोनस ठरतात. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्या कामगिरीला किंवा गुणवत्तेला आव्हान देतोय.
एक परिपूर्ण संघ तयार होण्यासाठी संघात असे सेहवाग, द्रविड, सचिन असावे लागतात तरच १ ल्या क्रमांकाचे शिखर गाठता येते!!!!
~अमेय
मी सचिनचा फ़ॅन नाहीये
आणि द्रविडचा तर मुळीच नाही
पर्सनल स्कोरसाठी खेळणारी लोकं आहेत ही
Sehwag is best!!!
अमेय:
:)
ज्ञानेश:
सेहवाग गॉड आहे गॉड
३००च ३ वेळा
आवरा
सचिनच्या स्वप्नात सुद्धा ३०० आले नसतील
अमेय:
:)
ज्ञानेश:
द्रविड आपला मरत मरत १०० काढतो
सेहवागला तोड नाही !!!
अमेय:
मोठ्या लोकांना नाव ठेऊन आपण मोठं होत नसतो मित्रा
:)
ज्ञानेश:
इथे मोठं कोण आहे?
फक्त सेहवाग
अमेय:
सचिन, द्रविड
ज्ञानेश:
शीSSSS
सचिन आणि द्रविड ?????????
या संभाषणावरून साहजिकच रण पेटलं !! आणि समस्त सचिन, द्रविड प्रेमींची बाजू मांडण्याची जबाबदारी मी घेतली!! काम तसं सोपं होतं :-)
अमेय जांभेकर - ज्ञानेश मित्रा, आपले खाजगी मध्ये चाललेले वाद चव्हाट्यावर आणून मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या. पण तुला हे दाखवून द्यायचं होतं की आज लोकांच्या मनात सचिन, द्रविड या खेळाडूंचं काय स्थान आहे ते. सचिन विषयी तोंडातून नुसता ब्र काढल्या काढल्या १५ मिनिटात २५ पेक्षा जास्त (जळजळीत!!) प्रतिक्रिया आल्या (त्या पण जगभरातून !!!) तरी पण तुझ्या स्वैर गोलंदाजीचा आपल्या कसलेल्या फलंदाजांनी घेतलेल्या समाचाराबद्दल माफी मागतो आणि माझे म्हणणे मांडायला घेतो.
सर्वप्रथम आपण जेंव्हा सांघिक खेळाविषयी बोलतो तेंव्हा २ खेळाडूंची तुलना करणे मला योग्य वाटत नाही आणि ते पण एकाच संघामाधल्या तर नाहीच - सेहवाग खेळला की सचिन खेळला याला महत्व नाही. संघ जिंकला का हे महत्वाचे आहे. इथे सामना २ संघांमध्ये आहे, खेळाडूंमध्ये नाही. आपल्या कामगिरीचा संघाच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम होणार हे प्रत्येक खेळाडूला माहित असते. संघाच्या यश-अपयशावर आपले यश अपयश अवलंबून असते हे पण तितकेच खरे आहे. अशा परिस्थितीत कोणी खेळाडू संघाचा विचार सोडून केवळ स्वतःच्या कामगिरीचा विचार करेल हे मनाला पटत नाही. तू जर एक गोष्ट पहिली असशील तर ती म्हणजे सेहवाग फालतू आहे अशी कॉमेंट कोणीच टाकली नाहीये, सगळ्यांचा रोष सचिन आणि द्रविडला कमी लेखल्याबद्दल होता. तुझ्या मतांचा आम्ही आदर करतो पण एखादा संघ, खेळाडू महान आहे किंवा तुला तसे वाटते, म्हणजे बाकीच्या खेळाडूंना तू कमी लेखू शकत नाहीस. माझा आक्षेप याच गोष्टीला आहे. जर्मनीचा संघ तरुण खेळाडूंचा आणि उत्तम सांघिक कामगिरी करणारा संघ होता, पण तू स्पेन फालतू आहे म्हणालास ते चुकीचं होतं. आणि स्पेनच्या संघाने ते दाखवून दिलं.
आता तुझं म्हणणं आहे की सचिन, द्रविड हे खेळाडू स्वतःसाठी खेळतात :
प्रथम द्रविड विषयी बोलूयात
द्रविड या माणसाविषयी मला अतिशय सहानुभूती आहे. त्याने नेहमीच पडद्यामागे राहून, वेळ प्रसंगी दुय्यम भूमिका घेऊन संघाचे हित पहिले आहे असं मला वाटतं ............ सांगतो कसं ते ........ द्रविडचा संघाने (गांगुलीने!!! ) नेहमीच आपल्याला हवा तसा उपयोग करून घेतला : एक अतिरिक्त फलंदाज खेळवता यावा म्हणून त्याच्यावर २००२-२००३ मध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकली. कधी सलामीचा फलंदाज नाही म्हणून कसोटीमध्ये त्याला सलामीला पाठवण्यात आलं. कधी त्याने ६ व्या क्रमांकावर येऊन सामना एकहाती काढून दिला. अगदी त्याचा पदार्पणाचा सामना आठवावा. त्याच सामन्यात गांगुलीने देखील पदार्पण केले होते, त्याने शतक ठोकले त्यामुळे त्याची कामगिरी लक्षात राहिली पण द्रविडला शतकासाठी ५ धावा कमी पडल्या तर आपण लगेच ती कामगिरी विसरून गेलो. २००१ मध्ये आपण फोलो-ओन नंतर ऑस्ट्रेलियाला हरवले तेंव्हा लक्ष्मणचे कौतुक झाले पण द्रविडने देखील १८१ धावांची खेळी केली होतीच ना? या सगळ्यात स्वतःचे हित कुठे पहिले त्याने?? २००३-०४ चा ऑस्ट्रेलिया दौरा तर त्यानेच गाजवला. त्याचं चीज म्हणून त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं आणि नंतर ICC चा मोसमातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब देखील मिळाला. संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढून सामना जिंकून देणे ही द्रविडची शैली तर सुरवातीपासून विजयाचा पाया रचणे आणि सामना जिंकून देणे ही सचिनची शैली.
सचिनविषयी काही बोलायची गरज आहे का? तरी पण थोडं सांगतो
त्याच्या खेळ्या आणि त्याचे तंत्र या विषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ..........
कोणत्याही संघाशी आणि कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी (कसोटी, एक दिवसीय आणि टी२०) जुळवून घेणे ही सचिनची खासियत. त्यामुळेच आज तो २० वर्ष पाय घट्ट रोवून उभा आहे. १९८९ मध्ये पदार्पण झाल्यापासून आजपर्यंत तो ७ वेगवेगळ्या कर्णधारांसोबत खेळला आहे पण कोणत्याही प्रकारचा वाद कधी उदभवलेला आपण ऐकला नाही, कारण? ते संघहिताचे नाही हे सचिनला माहित आहे. आज टी २० न खेळण्याचा निर्णय हा पण संघ हिताचाच भाग म्हणावा लागेल. त्यावरून असा निष्कर्ष काढण्याचा पण प्रयत्न झाला की सचिनला या प्रकाराशी जुळवून घेण्यात त्रास होतो वगैरे. पण यंदाच्या आयपीएल मध्ये त्याने हा मुद्दा खोडून काढला. आकड्यांवर विश्वास आहे का? सचिनला एकदिवसीय सामन्यांमध्ये ६१ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्यापैकी ५५ सामने भारताने जिंकले आहेत .......... मग तो संघासाठी खेळत नाही म्हणणे योग्य आहे का?
प्रती-आक्रमण करून समोरच्या संघाला हतबल करायचं ही सेहवागची शैली. तांत्रिक दृष्ट्या तो सचिन, द्रविड यांच्या जवळपास देखील नाही पण तरी त्याच्या शैलीने सगळ्यांनाच भुरळ पाडली हेही खरं. सोबर्स, व्हिव रिचर्डस या जुन्या खेळाडूंनी पण त्याचं कौतुक केलंय. पण सेहवाग मोकळेपणाने का खेळतो याचा विचार केलाय का कधी? कारण त्याच्यावर अपेक्षांचे ओझे नसते. आपल्यानंतर सचिन, द्रविड सारखे फलंदाज आहेत हे त्याच्या मनाला माहित असते. सेहवागवर आपला संघ कधीच अवलंबून नसतो कारण तो अगदी पुढच्याच चेंडूवर देखील बाद होऊ शकतो, हे सगळ्यांनाच माहित असते अगदी त्याला स्वतःलासुद्धा. त्यामुळे त्याने केलेल्या धावा ह्या संघासाठी नेहमी बोनस ठरतात. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्या कामगिरीला किंवा गुणवत्तेला आव्हान देतोय.
एक परिपूर्ण संघ तयार होण्यासाठी संघात असे सेहवाग, द्रविड, सचिन असावे लागतात तरच १ ल्या क्रमांकाचे शिखर गाठता येते!!!!
~अमेय
सही रे... सुरुवात तर झाली अन लSय भारी विषयाने झाली. आता लेख जरा नेमाने टाकत जा.
ReplyDeleteअरे... Free Hit ला मराठी नाव काय द्यायचं? फ़ुकटचा टोला? :)
तुम्ही सगळे सुचवा ....... ते टाकू आपण ....... आणि तुम्हाला काही लिहायचं असेल तरी इथे देऊ शकता तुमचे लेख
ReplyDelete